27) रत्नागिरी ( Ratnagiri )
उन्हाळी सुट्टी ; ज्ञानाशी गट्टी उपक्रम
आपले राज्य ; आपला जिल्हा
भाग सत्ताविसावा दिनांक :- 21 मे 2023 वार - रविवार
27) जिल्हा - रत्नागिरी माहिती
● रत्नागिरी जिल्हा हा कोकण विभागात येतो.
● रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा तर उत्तरेस रायगड जिल्हा (जुने नाव कुलाबा जिल्हा) आहे.
● रत्नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.
● या जिल्ह्याची शहरी लोकसंख्या ११.३३% इतकी आहे.
● हल्लीचा रत्नागिरी जिल्हा हा ब्रिटिश काळात आणि नंतरही उत्तर रत्नागिरी जिल्हा म्हणून ओळखला जात होता.
● हल्लीच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला दक्षिण रत्नागिरी जिल्हा म्हणत.
● दक्षिण रत्नागिरी जिल्ह्यात सावंतवाडी या संस्थानाचाही समावेश होता.
● सन १९८१ साली या जिल्ह्यांची नावे बदलली
● रत्नागिरी जिल्ह्यात 09 तालुके समाविष्ट आहेत - गुहागर, खेड, चिपळूण, मंडणगड, दापोली, रत्नागिरी, राजापूर, लांजा, संगमेश्वर
● आंबडवे हे रत्नागिरी जिल्ह्याच्या मंडणगड तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव होय. येथे विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक आहे, जे एक पंचतीर्थ आहे
● गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील गणपतीची मूर्ती स्वयंभू आहे अशी मान्यता आहे. येथील समुद्रकिनारा लोकांना आकर्षित करते.
● गुहागर येथे .श्री व्याडेश्वराचे प्रसिद्ध मंदिर येथे आहे.
● वादग्रस्त दाभोळ वीज प्रकल्प गुहागरला आहे.
● नारळ, पोफळी, कोकम व आंब्याच्या बागा हे चिपळूण परिसरातील प्रमुख पारंपरिक व्यवसाय आहेत.
● चिपळूण एक ऐतिहासिक शहर आहे.
● रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड येथे परमपूज्य साने गुरुजी यांचा जन्म झाला
● निसर्गसंपन्न आणि सौंदर्य असलेला जयगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २१ जून, इ.स. १९१० रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
● लांजा या अतिशय सुंदर गावात जाकादेवी, पोल्तेश्वर, केदारलिंग आणि जांगलदेव ही चार प्रसिद्ध देवळे आहेत.
● उन्हाळे येथे सदा सर्वदा अतिशय गरम असलेले हे पाण्याचे झरे इथे आहेत.
● राजापूरचा आंबा प्रसिद्ध आहे. राजापुरी भल्या मोठ्या कैऱ्या लोणच्यासाठी आणि पन्ह्यासाठी उत्तम असतात.
● पावस गाव गौतमी नदीच्या काठावर वसले आहे. स्वामी स्वरूपानंद स्मृतीमंदिर ( समाधी ) आहे.
● पावस येथून साधारण १० कि. मी. अंतरावर पूर्णगड किल्ला आहे.
● सोनवी आणि शास्त्री या दोन नद्यांच्या संगमावर हे शहर वसले असल्याने याला संगमेश्वर असे नाव मिळाले आहे.
● संगमेश्वर हे देवळांचे गाव आहे. या परिसरात सुमारे ७० पांडव कालीन देवालये आहेत. त्यातले कर्णेश्वराचे एका दगडातून कोरलेले भव्य देऊळ विशेष प्रसिद्ध आहे.
● रसाळगड हा महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.
● महिपतगड हा सगंमेश्वर तलुक्यातील एक गड आहे.
● रत्नागिरी जिल्हा हापूस आंब्यांसाठी जगप्रसिद्ध आहे.
●आंब्याप्रमाणेच काजू, नारळ, फणस, आमसूल(रातांबा) इत्यादींची लागवड येथे केली जाते.
● तांदळाची शेती येथे प्रामुख्याने केली जाते
● दापोली येथे डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाची स्थापना १८ मे १९७२ मध्ये झाली.
● दाभोळ येथे एनरॉन प्रकल्प कार्यान्वित आहे.
● रत्नागिरी जिल्हा एक निसर्गरम्य व पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जातो
● रत्नागिरी जिल्ह्यात एक लोकसभा व पाच विधानसभा मतदारसंघ आहेत.
●
रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध व्यक्ती - महर्षी धोंडो केशव कर्वे, महामहोपाध्याय पां वा. काणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, भागोजी कीर , स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, अनंत लक्ष्मण कान्हेरे
रत्नागिरी जिल्ह्यातील नद्या -
काजळी, केव, गड, बोर, मुचकुंदी, वाशिष्टी, शास्त्री, सावित्री, जगबुडी ई.
वरील माहिती इंटरनेटवरून संकलन करण्यात आले आहे. यात काही भर टाकायची असेल तर comment box मध्ये लिहावे.
खालील निळ्या अक्षरावर क्लीक करा, आपले पूर्ण नाव व जिल्हा नमूद करा आणि माहितीच्या आधारे प्रश्नांची अचूक उत्तरे निवडा.
10 पैकी 9 ते 10 प्रश्नांची उत्तरे आल्यास - SUPER
10 पैकी 7 ते 8 प्रश्नांची उत्तरे आल्यास - DUPER
10 पैकी 5 ते 6 प्रश्नांची उत्तरे आल्यास - BEST
10 पैकी 05 पेक्षा कमी प्रश्नांची उत्तरे आल्यास - TRY MORE
हा उपक्रम आपणांस कसा वाटला ? याविषयी आपला अभिप्राय खालील whatsapp क्रमांकावर जरूर कळवावे.
आपलाच,
नासा येवतीकर, विषय शिक्षक, जि. प. नांदेड 9423625769
धन्यवाद ..........!
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें